Tips for Roti :  आपल्याकडे प्रत्येक गोष्ट कशी असावी? याबाबत शास्त्रीय आधार असतो. तसेच आपल्या पूर्वजांनी ही काही गोष्टी सविस्तर सांगितलेल्या आहेत. पण धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येक गोष्ट आपल्याकडून होतेचं असं नाही. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जेवण करताना ते कसं वाढावं याबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत. जेवणाच्या ताटात भाजी, चपाती, आमटी कुठल्या दिशेला, पापड, लिंबू कोणत्या दिशेला पाहिजे? या सर्व गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवणाच्या ताटात चपाती वाढताना वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर काही चूका आहेत त्या टाळणे महत्त्वाचे आहेत. असे नाही झाले तर घरात क्लेश सुरू होण्यासोबतच घरातील धन-दौलत सुद्धा निघून जाऊ शकते. अशा कोणत्या चुका आहेत त्या केल्या नाही पाहिजे त्याबद्दल जाणून घ्या...(vastu tips for roti )


चुकूनही हातात चपाती देऊ नका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेवणाच्या ताटात चपाती वाढताना हातात चुकूनही चपाती देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार हातात चपाती देल्याने गरिबी वाढू शकते. तसे आपण केले पुण्य देखील कमी होऊ शकते. म्हणूनच अशा चुका करू नका. चपाती नेहमी ताटात किंवा भांड्यात ठेवावी. 


एकत्र 3 चपाती वाढू नका


अनेक वेळा नकळत अशा चुका हातातून घडतात ज्यामुळे आयुष्यात मोठे वादळे येतात. त्यातलाच एक म्हणजे चपात्या वाढवणे... जेवणाच्या ताटात एकदम तीन चपात्या वाढल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच संपूर्ण कुटुंबाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. सनातन धर्मानुसार भोजन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला केव्हाही 3 चपात्या एकत्र वाढू नका... 


पाहूण्यांना शिळ्या चपात्या वाढू नका


अनेकदा शिळ्या चपात्या दुसऱ्या दिवशी खाल्या जातात. जर तुम्ही याच शिळ्या चपात्या चुकून घरी आलेल्या पाहूण्यांना वाढल्या तर तुमचे नुकसान होऊ शकते. असे केल्याने देव आपल्यावर नाराज होऊ शकतात. त्यामुळे अशा चुक कधीही करु नका...


पुष्कळदा प्युपे उरले तर ते ताशच ठेवून खाल्ले जातात. जर तुम्ही त्या दगडाच्या चकत्या खाल्ल्या तरच तुमच्याकडे एखादा साधू किंवा पाहुणा आला आणि तुम्ही त्यांना दगड खाऊ देऊ नका तर बरे. असे केल्याने देव अयावर संतप्त होतो. म्हणूनच कधीही चूक करू नका.


गरजेपेक्षा 4 चपात्या जास्त बनवा


ज्योतिषाचार्यांच्या मते, घरातील कुटुंबांसाठी जेवढ्या चपातीची गरज आहे, त्यापेक्षा जास्त 4 चपात्या बनवा. कारण यामधली पहिली चपाती गाईसाठी बनवली जाते. तर शेवटची चपाती ही नेहमी श्वान (कुत्र्यासाठी) बनवली जाते. तर उरलेल्या दोन चपात्या या पाहुण्यांसाठी ठेवल्या पाहिजे.. असे केल्याने घर कधी रिकामी राहत नाही आणि घरात सुख-शांती टिकून राहते.