COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद : मित्रासोबत असलेल्या मैत्रीला पालकांनी आक्षेप घेतल्यामुळं १८ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली. पायल गायकवाड असे विद्यार्थिनीचं नाव आहे. औरंगाबादच्या मिटमीटा भागात ही घटना घ़डली आहे. पायलने पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पायलने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती. 


आत्महत्येपूर्वी पायलने लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळावर पोलिसांना आढळली आहे. यात ‘जशी मैत्रीण असते, तसाच मित्र असतो. मग मुला-मुलीच्या मैत्रीत गैर काय?,’ असा भावनिक प्रश्‍न पायलने, चिठ्ठीत उपस्थित करून जीवनयात्रा संपविली आहे.