लातूर : ३० सप्टेंबर १९९३... लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथं महाप्रलंयकारी भूकंप होऊन हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. याच दुर्घटनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि १९९३ मधील तत्कालीन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे किल्लारीत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.


निर्धार समारंभ 


 याशिवाय लातूर उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्त करण्यासाठी किल्लारीत एका मोठ्या जाहीर सभेचे आयोजनही करण्यात आलंय. तर दुपारी 'निर्धार समारंभाचंही आयोजन करण्यात आलंय.