मुंबई : कोकणात जाणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी रेल्वेनं १४२ जादा फेऱ्यांची घोषणा केली होती. पनवेल ते सावंतवाडी, कुर्ला टर्मिनस-एलटीटी ते करमाळी आणि मुंबई ते चिपळूण या मार्गावर या गाड्या चालणार आहेत. 


मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून दरवर्षी गणेशोत्सवासाठी जादा फे-या सोडल्या जातात. आता आणखी ६० जादा फेऱ्यांची घोषणा केल्यानं आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 


१९ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान पनवेल-सावंतवाडी विशेष ट्रेन दर शनिवारी संध्याकाळी ७.३५  मिनिटांनी सुटेल. आणि सावंतवाडील दुस-या दिवशी पहाटे ४.२० मिनिटांनी पोहोचेल. मध्य रेल्वेनं पहिल्यांदा पनवेल-सावंतवाडी ही विशेष गाडी सोडली आहे. त्यामुळे पनवेल आणि त्यापुढील प्रवाशांना एक नवा पर्याय उपलब्ध झालाय.