पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली. पण त्याच वेळी त्यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतल्या वजनाची माहिती देत कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीची ताकत वाढवण्याची साद घातली.दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर फक्त शरद पवार हेच महाराष्ट्राचे ताकतवान नेते आहेत आणि तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांच्यापासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीपर्यंत सर्वजण त्यांच्याजवळ आहेत. देशाचे राजकारण त्यांच्या भोवती फिरत आहे म्हणून त्यांची ताकत वाढवा असं आवाहन त्यांनी केले. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्याया निर्णयावर आणि कार्यशैलीवर जोरदार टीका केली.