जळगाव : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा गेल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल जळगावात केली होती. जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना अजित पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. यावेळी बोचरी टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार तुमचे, मंत्री तुमचे, असे असताना उद्धव ठाकरे मुंबईत बसून काहीच करत नाहीत. उलट बाहेर येऊन बोलतात. त्यामुळे उद्धव यांची अवस्था आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 


कृषी मंत्र्यांची खिल्ली


दरम्यान, राज्यात शेतकरी संकटात असताना कृषी खाते आहे कुठे? राज्याचे कृषी मंत्री आहेत कुठे, असा सवाल अजित पवार यांनी केलाय. कृषिमंत्री दाखवा आणि हजार रुपये मिळवा. अशी खिल्लीही यावेळी अजित पवार यांनी उडविली.