दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : उद्धव ठाकरे सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्रानं अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्या. एका रात्रीत आलेलं फडणवीस-अजित पवारांचं सरकार हा क्लायमॅक्स होता. त्यावेळी नेमकं काय घडलं, याची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला आहे. मात्र या सीनमधले दोन्ही नायक सध्यातरी काही बोलायला तयार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


योग्य वेळ येताच बोलू, असं फडणवीस म्हणतायत, तर कितीही प्रश्न विचारा उत्तर मिळणार नाही, असं अजितदादा ठणकावतायत. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात आलेल्या अजित पवारांना बोलतं करण्याचा आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी प्रयत्न केला..