Amaravati Murder Case : अमरावती हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी यापूर्वी दोन वेळा उमेश कोल्हे यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. प्रयत्नात अपयश आल्यानंतर आरोपींनी तिसऱ्यांदा उमेशचा गळा चिरून खून केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान असे समोर आले की, 19 जून रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक सोहेब खान भुर्या हा त्याच्या एका साथीदारासह उमेश यांना मारण्यासाठी गेला होता, मात्र त्यावेळी तो थोडा घाबरला होता. यानंतर तो 20 तारखेला पुन्हा खून करायला गेला, मात्र त्यादिवशी उमेश रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद करून लवकर घरी गेले होते, त्यामुळे त्याला खून करता आला नाही.


21 जून रोजी ही हत्या


तिसऱ्यांदा म्हणजेच 21 जूनला हे 5 जण एकत्र आले. यातील तीन जण दुचाकीवर होते आणि दोन जण त्यांना उमेश कुठे पोहोचला याची माहिती देत ​​होते. अमरावती हत्याकांडाच्या मास्टर माइंडला पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. इरफान शेख असे या सूत्रधाराचे नाव आहे. इरफानच्या सांगण्यावरून या आरोपींनी मिळून हा खून केला. एकूणच या हत्येतील सातही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.


उमेश कोल्हे नावाच्या 50 वर्षीय व्यक्तीचा गळा चिरून खून करण्यात आला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे हे मेडिकल स्टोअर चालवत होते. नुपूर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट टाकल्याने हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे.