मुंबई : सिंधुदुर्गासह महाराष्ट्रातील अनेक भाविकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भराडीदेवीची यात्रा म्हणजे आंगणेवाडीच्या यात्रेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भराडीदेवीची यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी भाविकांना न येण्याचं आवाहन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगणवाडीच्या जत्रेची ६ मार्च निश्चित झाली आहे. मात्र यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. यात्रेला भाविकांनी न येण्याचं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' च्या धर्तीवर 'माझी जत्रा माझी जबाबदारी' असं अभियान जत्रेत राबवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.   


भराडीदेवी यात्रा भाविकांसाठी रद्द केली असली तरीही धार्मिक कार्यक्रम दोन दिवस सुरू राहणार आहेत.  धार्मिक कार्य कसं करायचं यावर आज तिथल्या मंडळाची उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली आहे. ट्रस्टची आणि पालकमंत्री म्हणून माझी भाविकांना विनंती आहे यात्रेकरूनी यावर्षी दर्शनासाठी येऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निर्णयाचं पालन करावं. 


'यावर्षी आंगणेवाडीची जत्रा साध्यापद्धतीने साजरी केला जाणार आहे.  यापूर्वी डिसेंबर महिन्यात तारीख जाहीर केली होती, तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा होता. त्यामुळे जत्रा रद्द करण्यात आली होती. आजही कोरोनाचा धोका टळलेला नाही. पण यात्रा ६ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.  तेव्हा यंदाची यात्री ही आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आंगणेवाडी विकास मंडळाचे भास्कर आंगणे यांनी दिली आहे. 


आम्ही यात्रेकरूना नम्र विनंती करतो त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, असं ही यावेळी भास्कर आंगणे म्हणाले.