मुंबई : माणसांचे वय वाढते तसे त्याची परिपक्वता वाढते तशी राऊतांचीही परिपक्वता वाढावी अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे आमदार, नते, गटप्रमुख यांची महत्त्वाची बैठक मुंबईत सुरु आहे. याआधी आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधत राऊतांना टोला लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती केवळ बंद खोलीतील चर्चा नव्हती ते आमच्यासाठी मंदिर आहे. आम्ही कधी खोटे बोलणार नाही असे विधान राऊत यांनी केले होते. आम्हाला खोट्यात पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा टोला त्यांनी अमित शाह यांना लगावला होता. कोणाला खोटे ठरवण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्राला सत्य समजवण्याचे काम अमित शहांनी केल्याचे उत्तर शेलार यांनी यावेळी दिले. अमित शाह यांनी सांगितलेले सत्य आहे तेच सांगण्याचे काम भाजपाचा कार्यकर्ता करतो. ते सत्य सांगितल्याने कोणाची अडचण होत असेल तर त्यांनी पाहावे. आमच्यात एकवाक्यता आहे त्यामुळे गैरसमज पसरवण्याचा प्रश्न करत नाही.



उद्धवजींसोबतचे बोलणे पंतप्रधानांकडे पोहोचवायला हवे होते. पंतप्रधान उद्धवजींना भाऊ मानतात. त्यांना या भावना पोहोचल्या असत्या. पण तसे काही न झाल्याने ही वेळ आल्याचे राऊत म्हणाले. यालाही शेलार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. ठाकरे आणि मोदी यांच्यात विसंतुष्ट आणण्याचा प्रयत्न रोज सकाळी केला जातो असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे समजून घेण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील.


आज महाराष्ट्र भाजपाच्या सर्व नेते, जिल्हाधिकारी, गटाधिकारी यांची बैठक होत आहे. ९० हजार बुथवर जाऊन भाजपाची संघटना बळकट करण्याचे काम केले जाईल. निवडून आलेले सर्व आमदार आणि खासदार शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी जाणार असल्याची माहिती शेलार यांनी यावेळी दिली.