धुळे : भाजप आमदार अनिल गोटे यांनी नमाजबाबत खळबळजनक व्यक्तव्य केले आहे. मुस्लिम बांधव नमाज अदा करताना जमिनीवर डोकं टेकवतात म्हणजेच ते मातीला नमन करतात. नमाज अदा करताना मातीला नमन करतात मग बोलायला काय अडचण आहे? असा प्रश्न आमदार गोटे यांनी उपस्थित केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृतीत आपल्या भूमीला वंदन करायचं आणि बोलायचं नाही असं कसं चालेल? असं सांगत हा देश का कोणाच्या बापाचा आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत आमदार गोटे यांनी खळबळ उडवून दिली आहे. जो पर्यंत वंदे मातरम बोलायचा विषय नव्हता तोपर्यंत आम्हाला काही हरकत नव्हती मात्र , वंदे मातरम म्हणणार नाहीत असं म्हणाल तर मग वंदे मातरम म्हणावाचं लागेल, असा इशाराही अनिल गोटेंनी दिला आहे.