नाशिक : तब्बल 20 महिन्यानंतर नाशिकच्या जालिंदर उगलमुगले हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांना लागला आहे. १ ऑक्टोबर २०१५ रोजी जालिंदरचं अपहरण झालं होतं. मात्र त्याची हत्या झाल्याचं चार दिवसांपूर्वी पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. यात भाजपचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांचाही समावेश आहे.


हेमंत शेट्टीच्या सांगण्यावरुन हे अपहरण आणि हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. वर्चस्व आणि वादातून ही हत्या झाल्याचं पूढे येतं आहे.