औरंगाबाद : हल्ली लग्नासाठी हवा तसा अपेक्षित जोडीदार भेटत नाही. त्यामुळे अनेक तरुण/तरुणी वयाच्या तिशीपर्यंत लग्न करत नाहीत. मात्र त्यानंतर लग्नासाठी जोडीदाराचा शोध सुरु होतो. पण तेव्हा मात्र जोडीदार भेटत नाही. मग अशावेळेस एजंट लोकं पैसे घेऊन लग्न जुळवून देण्याचं काम करतात. अशाच एका तरुणीने चक्क 7 लग्न केले. मात्र ती एकासोबतही नांदली नाही. तब्बल 7 लग्नानंतरही तिचं एकाही नवऱ्यासोबत न नांदण्याचं धक्कादायक कारण समोर आलं. (bride arrested for marrying seven times for money)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर ही वधू फक्त नि फक्त पैशांसाठी लग्न करायची आणि पळ काढायची. अशाच या पळकाढ्या वधूला जेरबंद करण्यात आलंय. या सर्व प्रकरणात एक टोळी सक्रीय होती. पोलिसांनी या टोळीला ही जेरबंद केलं. 


ही टोळी नवरदेव शोधण्यापासून, पैसे घेईपर्यन्त आणि त्यानंतर मुलीला पळवून लावण्याची सोय करायची स्वत: वधूने पोलीस चौकशीत ही माहिती दिली. 



असं बिंग फुटलं


ही मुलगी जळगाव मध्ये सातवं लग्न करणार होती.  मात्र औरंगाबादच्या खुलताबादमध्ये झालेला तिचा लग्नाचा फोटो व्हायरल झाला. ज्याच्याशी सातवं लग्न ठरलं होतं त्या तरुणाच्या कुटुंबियांना संशय आला. त्यावरून तपास सुरु झाला आणि बिंग फुटलं आणि या टोळीचा बाजार उठला.