औरंगाबाद : औरंगाबादमधील कडेठाण गावातून एक बस पैठणकडे जात होती. मात्र, पावसाचा वेग वाढल्यानं गावातील रस्त्यावर मध्येच एक नाला असून त्यात बस अडकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसमध्ये ६ ते ७ प्रवासी होते. मात्र वेळीच गावकऱ्यांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढलं.


 मात्र, पाणी कमी झालं नसल्यानं अजूनही बस अडकली आहे. बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर निघाल्याने मदत करणाऱ्या गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले  आहे.


 नाल्याचं पाणी कमी झाल्यानंतर बस बाहेर काढण्यात यश येणार असल्याचा स्थानिकांचा अंदाज आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचा आनंद सर्वांना आहे.