नागपूर : नागपूरच्या मानकापूर परिसरातील गायत्री नगरमध्ये विहिरीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अडीच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विहिरीत तीन जण पडले होते. त्यांना वाचवताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीच्या ढिगाऱ्याखाली अंकुश चौधरी हा अडीच वर्षांचा मुलगा अडकला होता त्यातच त्याचा अंत झाला. 


दरम्यान विहिरीत पडलेल्या तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने ढिगारा बाजूला करून, या चिमुकल्याचा मृतदेह काढण्यात आला.