विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : क्रेडीट कार्डच्या थकीत बिलासाठी धमक्या देण्याचे प्रकार आपण ऐकले वा पाहिले आहे, मात्र बिल भरले नाही म्हणून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघड झाला आहे. कंपनीच्या वसूली एजंटने या महिलेला शिव्यागाळ देखील केल्याचं समोर आलं आहे.  या सगळ्यानंतरही औरंगाबाद पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी तक्रारकर्त्यांनाच त्रास दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादच्या सोनी कुटूंबियांना पोलिसांनी तक्रार केल्यानंतर ही दाद दिली नाही.सोनी यांच्या पत्नीकडे क्रेडीट कार्ड होते. त्यावर त्यांनी 46 हजारांची खरेदी केली त्यातील 25 हजार भरले मात्र लॉकडाऊनमुळे धंदा थोडा कमी झाला आणि क्रेडीट कार्ड बिल थकलं.त्यामुळं कंपनीकडून वसूलीसाठी फोन यायला लागले.


सुरुवातीला थोडंबहूत बोलल्यानंतर कंपनीचे लोक थेट शिवीगाळ करू लागले, इतकंच नाही तर पैसै भरायला नसतील तर शरीरसंबंधांची मागणी या कंपनीच्या वसूली एजंटने केली. इतकंच नाही तर या महिलेच्या वडिलांचा नंबर शोधून त्यांनाही अपशब्द वापरले.



अखेर वैतागलेल्या सोनी यांनी थेट एमआयडिसी सिडको पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. एका महिलेला अशी मागणी करणं गुन्हाच मात्र तरी सुद्दा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर जुलै महिन्यात तपासासाठी इन्क्रेडीबल इंडिया या दिल्लीच्या कंपनीत चौकशीला जायचं असे पोलिसांनी सांगितले, तिथं जावून थातुर मातूर चौकशी पोलिसांनी केली आणि तेथून तक्रारदारालाच वैष्णव देवीचे तिकीट काढून पोलिसांनी फुकट तिर्थयात्रा सुद्दा केली..


अखेर कंटाळलेल्या या कुटूंबियांनी पोलिस आयुक्त कार्यालय गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आता तरी न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. क्रेडिट कार्ड कंपनीचे पैसै भरायचेच आहेत, मात्र देशातल्या नामांकीत एसबीआय़ सारख्या कंपनीचे कार्ड घ्यायचे आणि त्यांनी नियुक्त केलेल्या वसूली कंपनीचे लोक असे वागतील तर जबाबदार कोण असा प्रश्न आहे.. आता या सगळ्यानंतर औरंगाबादच्या या दोषी पोलिसांवर आयुक्त कारवाई करतात का हेच पाहणे महत्वाचे आहे..