अनिरुद्ध दवाळे, अमरावती : अमरावतीच्या सावंगी मग्रापूर गावातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात मागील 28 दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणी पुरवठाच होत नसल्याने दलित कुटुंबीयांनी गाव सोडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावाच्या इतर भागात नियमित पाणी पुरवठा होतोय, पण दलित कुटुंबीयांना पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.



त्यामुळे बुधवारी रात्रीपासून नागरीकांनी गावापासून दोन किलोमीटरवर जाऊन ठिय्या मांडला.


मध्यरात्रीपासून लहान मुलाबाळांसह गावाबाहेर रात्रभरात शेकोट्या पेटवून रात्र काढली.


गावातील उपसरपंचाने जाणीवपूर्वक दलितांचा पाणीपुरवठा बंद केल्यानं दलितांनी गाव सोडल्याचा आरोप सचिन खरात यांनी केला आहे.