उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे सत्ता गेल्याच्या मनस्थितीत आहेत. बोलण्यासाठी आता काहीच शिल्लक नसल्याने ते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतायेत असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) लगावलाय. महाराष्ट्र बंद करण्याची उद्धव ठाकरे यांची क्षमता आहे का? असा उपरोधिक सवाल बावनकुळेंनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांना बोलण्यासाठी आता काहीच उरले नसल्याने ते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत.  सत्ता गेल्याच्या मनस्थितीत उद्धव ठाकरे भाजप महाराष्ट्र तोडत असल्याचे वक्तव्य करत असल्याचा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यानंतर राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत यासाठी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 
महाराष्ट्र बंद करण्याची उद्धव ठाकरे यांची क्षमता आहे का? असा उपरोधक सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.


आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्याबाबत बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे ज्या लोकांशी गळाभेट करत आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सावलीपाशी घेतलं नाय होत उद्या तुम्ही ओवैसीचे सुद्धा विचार स्वीकाराल असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.