ठाणे : समृद्धी महामार्गाचं काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच केलं जात असल्याचा खुलासा, सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शनिवारी ठाण्यातल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरुन सरकारवर तोफ डागली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना विश्वासात घेत नसून, या महामार्गाच्या आडून वेगळ्या विदर्भाची चूल रचली जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. असं होत असेल तर समृद्धी महामार्गाला विरोध करू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यावर एकनाथ शिंदेंनी डोंबिवलीत सरकारची भूमिका मांडली.