रत्नागिरी : मुंबई-गोवा म‍हामार्गावर पहाटे ५ वाजण्‍याच्‍या सुमारास दोन कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महामार्गावर लोणेरेजवळ उसरघर इथे मुंबईहून चिपळूणकडे जाणारा कंटेनर आणि मुंबईकडे येणारा दुसरा कंटेनर यांची समोरासमोर टक्‍कर झाली . याचवेळी एक स्‍कुटीही त्‍यांना जाऊन आदळली.  स्‍कुटीचालकासह दोन्‍ही कंटेनरमधले चार जण असे एकूण पाच जण ठार झाले. 


अपघातानंतर  दोन्‍ही कंटेनरला आग लागली आणि कंटेनरचे मोठं नुकसान झाले . पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेवून स्‍थानिकांच्‍या मदतीने आग विझवली. आणि वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्‍त दोन्‍ही कंटेनर हे राजस्‍थान पासिंगचे असल्‍याची माहिती मिळाली आहे.