औरंगाबाद : एकीकडे शेतक-यांच्या आत्महत्या थांबवण्याचं नाव घेत नसताना आता शेतक-यांच्या मुलांच्या आत्महत्याही समोर येत आहेत. लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी शेतक-याच्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षा कैलास राठोड असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव असून ती मूळची जालना जिल्ह्यातील अंबडची रहिवासी होती. ती औरंगाबादमध्ये बी.कॉमच्या तिस-या वर्षाला शिकत होती. मात्र तृतीय वर्षात नापास झाल्यामुळं ती निराश झाल्याचंही आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलंय. 


आई-वडलांनी शिक्षणासाठी सोनं गहाण टाकून खर्च केला. आता लग्नासाठीही हुंड्याचा खर्च करावा लागेल. ते आपल्याला नको असल्याचं गळफास लावून आत्महत्या करत असल्याचं वर्षानं चिठ्ठीत लिहिलंय. मराठवाड्यात शेतक-यांची अवस्था गंभीर असल्याचं यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आलंय.