चंद्रपूर : सध्या महाराष्ट्र दौ-यावर असलेले केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर हे चर्चेत आले आहेत. नुकतेच चंद्रपूर येथे गेले होते. इथे एका रूग्णालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी डॉक्टरांविषयी वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे बोलताना हंसराज अहीर यांनी डॉक्टरांना थेट नक्षलवादी बनण्याचा सल्ला देऊन टाकला. ते म्हणाले की, ‘जर डॉक्टरांना लोकशाहीमह्द्ये विश्वास नसेल तर त्यांनी नक्षलवादी बनलं पाहिजे आणि नंतर आम्ही त्यांना गोळ्या घालू’.



ते पुढे म्हणाले की, ‘मी लोकशाही पद्धतीने निवडला गेलो आहे. मी येत असल्याचे आधीपासून माहिती असूनही डॉक्टरांनी सुट्टी का घेतली? जर त्यांचा लोकशाहीमध्ये विश्वास नसेल त्यांनी नक्षलवाद्यांसोबत निघून जावं, जेणेकरून आम्ही त्यांना गोळ्या घालू’.