वर्धा : संपूर्ण देशाला हरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. आरोपीविरुद्ध 302 चा गुन्हा सिद्ध झाला. उद्या कोर्टात आरोपीला शिक्षा सुनावण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांची दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे प्रकरण ?


हिंगणघाट जळीतकांड प्रकरण 2 फेब्रुवारी 2020 ला घडले होते. प्राध्यापिका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकुन जाळण्यात आले होते. 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फरवरी 2020 रोजी पहाटे तिचा मृत्यू झाला होता.


पीडितेच्या मत्यूनंतर वर्ध्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. यावेळी आरोपींवर तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला अटक करण्यात आले आहे. 


याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार होती. पण, न्यायालयीन कामकाज पूर्ण न झाल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.


या प्रकरणाची आज सुनावणी झाली. न्यायालयात आरोपीविरोधात 302 चा गुन्हा सिद्ध झाला. मात्र, आज आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली नाही. उद्या आरोपीला न्यायालयात शिक्षा सुनावण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.