कल्याण : कल्याण शहरातील महत्वाच्या पत्रीपुलाचे काम मागील 2 वर्षापासून सुरु असून आता या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरु होणार आहे. मात्र यासाठी मोठी क्रेन जुन्या पुलावर ठेऊन गर्डर उचलावे लागणार असून रात्री हे गर्डर टाकले जाणार आहेत. यामुळे बुधवारी रात्रीपासून सोमवार 24 ऑगस्ट पर्यत रात्री 10 ते पहाटे 5 पर्यत या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या वेळेत या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आल्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काढले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणातील पत्रीपुलावर गर्डर टाकण्यासाठी जुन्या पुलावरून होणारी वाहतूक बुधवारी 19 तारीखेच्या रात्री 10 पासून ते पहाटे 5 च्या दरम्यान बंद करण्यात आली आहे. याकरिता रात्री बंदच्या दरम्यान वाहतूक वळविण्यात आली आहे. बुधवार पासून हे बदल केले जाणार असून वाहनचालकांनी हे बदल लक्षात घेत प्रवास करावा असे आवाहन वाहतूक पोलिसाकडून करण्यात आले आहे.



अशी असेल वाहतूक


कल्याण शिळ रोडवरून जाणाऱ्या जड आणि अवजड वाहनांना रांजनोली नाक्यावरून प्रवेश बंद करण्यात आला असून हि वाहने रांजनोली नाक्यावरून भिवंडी येथून खारेगाव टोलनाका मुंब्रा बायपास मार्गे जातील...


शिळरोड वरून जाणाऱ्या हलक्या वाहनांना दुर्गामाता चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून हि वाहने आधारवाडी चौक खडकपाडा चौकातून वालधुनी पुलावरून कल्याण पूर्वेतून इच्छित स्थळी जातील..


कल्याण नगर मार्गावरील वाहनांना सुभाष चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून हि वाहने नेताजी चौकातून वालधुनी पुलावरून इच्छित स्थळी मार्गस्थ होतील.