बीड : परळी तालुक्यातील कौठाळी इथे किरकोळ वादातून राजेंद्र चव्हाण याने आपल्या पत्नीचा निर्घृण खून केला,या घटनेची खबर पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक करून सुनीता चव्हाण यांचे शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय परळी इथे पाठवून दिले. मात्र घटना ज्या भागात घडली आहे, त्या भागातील नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करावे असे परळीच्या डॉक्टरांनी सांगितल्याने नातेवाईक हैराण झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री तीन वाजण्याच्या सुमारास घटना घडल्यांनातर पहाटे सात वाजेपासून नातेवाईकांना शवविच्छेदन करता आले नाही. तब्बल सहा तास शवविच्छेदन रखडलं होतं. मृत व्यक्ती ही आमच्या हद्दीत मृत झालेली नाही म्हणून आम्ही शवविच्छेदन करणार नाही, असे म्हणून मृतदेहाची अवहेलना करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.