कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीरच बनत चाललीय. पंचगंगा नदी सध्‍या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत असून कोल्हापूर - पन्हाळा मार्गावरील रेडे डोह फुटलाय. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होताना दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. सध्या पंचगंगा नदी ४३ फूट ८ उंचावरून वाहतेय. जिल्ह्यातील अनेक गावाच थेट संपर्क तुटलाय. पण या गावांशी पर्यायी मार्गाने संपर्क सुरू आहे. 


जिल्ह्यातील सर्वच धरण १०० टक्के भरली असून राधानगरी धरणाच्या चार स्वयंचलित दरवाज्यामधून ७ हजार ११२ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी आलं असून प्रशासनाने अनेक ठिकाणच्या लोकांना स्थलांतरीत केलंय.