सांगली : विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदानाला सुरुवात झाली आहे. दिग्गजांसह ३ हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे यंदाचे मतदान हे तोडीचे होणार आहे. राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र असून राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करून मतदान सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत असून जिल्ह्यात मतदानाला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्याचमोठ्या रांगा आहेत. दरम्यान इस्लामपूर येथील साखराळे गावातील 63 क्रमांकाचा मतदान केंद्रातील मतदान यंत्र बिघाड झाल्याने 45 मिनिटे मतदान थांबले होते. मतदान यंत्र दुरुस्त केल्यावर 45 मिनिटांनी मतदान सुरू झाले.



यंत्रणा सज्ज 


नक्षलग्रस्त गडचिरोलीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था देखील करण्यात आलं आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.मतदानाच्या पूर्वसंध्येला राज्यात पावसाचं धूमशान असून आजही पावसाचं सावट पाहायला मिळत आहे. पावसाचा परिणाम मतदानावर होणार का? अशी चिंता उमेदवारांना लागून राहिली आहे. 


राज्यात एकूण ८ कोटी ९८ लाख मतदार आहेत. तर मतदानासाठी राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र निर्माण करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच १ लाख ३५ हजार व्ही व्ही पॅट यंत्रांची सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सुविधा पुरवण्यात आली आहे. तर सहा लाखांहून अधिक कर्मचारी आणि तीन लाख पोलीस मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.