मुंबई : राज्यात आता कोरोनाचे 67,160 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 676 जणांना आपला जीव गमवला आहे. आज राज्यात 63,818 जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 34,68,610 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.02 टक्के झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत राज्यात 2,54,60,008 जणांची कोरोना चाचणी झाली असून 42,28,836 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,87,675 व्यक्ती होमक्वारांटाईन असून 29,246 व्यक्ती सांस्थात्मक क्वारांटाईन आहेत. राज्यात आज 6,94,480 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 


नाशिकमध्ये आज 5034 जणांनी कोरोनावर मात केली असून 5918 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या 24 तासात 46 जणांचा मृत्यू झाला आहे.


मुंबईत आज 5888 नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे.


नागपुरात आज 7,999 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर 82 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपुरात आज 6264 जणांना कोरोनावर मात केली आहे.


कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आज 1899 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका दिवसात 1208 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.