मुंबई : Cabinet expansion of Maharashtra Government : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मात्र, दोन आठवडे होत आले तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दोनच मंत्री सध्या काम पाहत आहेत. लवकरच विस्तार होईल, असे सांगण्यात येत होते. 19 जुलैला हा विस्तार होईल असे सांगण्यात येत होते. परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती निवडणुकीत नाराजी टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता. तो लांबणीवर टाण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्याचवेळी 19 ते 21 जुलैदरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. मोजक्याच 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार अशी माहिती होती. मात्र, बंडखोर आमदारांची सध्याच्या सरकारला नाराजी भोवण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचे बोलले जात आहे.


शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या नाराजीची भीती आणि शिंदे गटाकडून अधिकच्या मंत्रिपदाची मागणी त्याबरोबरच भाजपमध्ये मंत्रिपदासाठी होत नसलेले मतैक्य या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे सरकारचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नाराजी नाट्य होऊन याचा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतरच 19 ते 21 जुलैच्या दरम्यान माहिती सूत्रांनी दिली आहे. 


30 जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. त्यानंतर तीन आठवडे उलटून मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे गंगेत न्हाले नाही. भाजपला 29 आणि शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी 13 मंत्रिपदे देण्याचे ठरले होते. शिंदे गटात ठाकरे सरकारमधील 7 मंत्री आहेत. त्यांना मंत्रिपद द्यावे लागणार आहे. शिंदे गटात 40 बंडखोरांसह  10 अपक्ष आहेत. म्हणूनच शिंदे गटाला अधिकची मंत्रिपदे पाहिजे आहेत.