Maratha Reservation Before Diwali: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सलग नववा दिवस आहे. आता त्यांनी पाणीदेखील त्यागण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिवाळीधीच जरांगे पाटलांना गोड बातमी देणार, असे आश्वासन भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आमदारांनाही आपल्या सरकारला धारेवर धरण्याचा अधिकार आहे. असे असले तरी दिवाळीच्या आधी जरांगे पाटील यांना गोड बातमी देऊ आणि त्यांच्या सोबत आम्ही फराळ खाऊ, असा शब्द नितेश राणे यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे पाटील हे शिवबा संघटनेचे आहेत. ते कांग्रेस सोबत होते याची मला माहिती नाही. तुमच्याकडे काही फोटो असतील तर मला माहीत नाही, असे नितेश राणे म्हणाले. मनोज जरांगे यांना स्क्रिप्ट कोण पुरवते हे आम्हाला उघड करावे लागले असा इशारा नितेश राणे यांनी काही दिवसांपुर्वी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राणे बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यात क्षमता असल्यामुळे ते अपेक्षा करत आहे
ज्याला जास्त आंबे त्यालाच सर्वात जास्त दगड मारले जातात, या म्हणीची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. 


उबाठा शिष्टमंडळ राष्ट्रपती यांना भेटून मराठा आरक्षण संदर्भात केंद्र सरकारला लक्ष घालायला सांगण्याचे आवाहन करणार आहे. तसेच पंतप्रधानांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलावे, अशी राऊतांची इच्छा असल्याचे राणे म्हणाले. तुम्ही उठसुठ  मोदी आणि केंद्र सरकार यांच्याकडे बोट दाखवता. मग राहूल गांधी यांची काय भूमिका काय आहे? त्यांनी साध एक ट्विट तरी केल आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


मातोश्रीवरुन वरच्या मजल्यावर बसुन फोन हॅक केले जायचे. आमच्यासारख्या कडवटांचे फोन हॅक व्हायचे. याची माहिती संजय राऊत यांनी द्यावी नाही तर मी ही माहिती जनतेला देऊ शकतो, असे ते म्हणाले. संदीप देशपांडे आणि इतर 10 ते 11 जणांचे फोन हॅक केले होते. आमच्यावर वॉच ठेवण्यासाठी हे केले जात होते. जास्त बोलले तर मी हॅकरला पत्रकार परिषदेत बसवेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.