औरंगाबाद : शिवसेना म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. शिवसेनेचे मंत्री मराठवाड्यातील आहेत. खासदार आमदारही आहेत, मात्र तरी सुध्दा शिवसेना मराठवाड्याचे प्रश्न सोडवू शकली नाही. हे काय विकास करणार असा प्रश्न नारायण राणेंनी विचारलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालेली बैठक विकास कामांसाठी होती मंत्रीपदाच्या चर्चेसाठी नव्हती. मंत्रीमंडळ प्रवेशाबाबत लवकरच चर्चा होईल. प्रश्न जर दिल्लीत अडकला असेल तर तो मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे तो त्यांनी सोडवावा असंही राणे म्हणाले आहेत.