Nashik News : महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यांमध्ये घडणारे गुन्हे आणि त्यामुळं सातत्यानं माणुसकीला लागणारा काळीमा हे सर्व चित्र काही केल्या सुधारण्याचं नाव घेत नाही. नुकत्याच समोर आलेल्या एका भयावह घटनेमुळं पुन्हा हेच सिद्ध केलं आहे. कारण, या घटनेमुळं सबंध नाशिक हादरलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या कळवण येथील दुर्गम भागात असणाऱ्या लिंगामा गावाजवळ असणाऱ्या एका विहीरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना आढळून आले. ही घटना उघडकीस येताक्षणी एकच खळबळ उडाली. मयत मुलींची ओळख पटली असून, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत त्यांचे हे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्याचं म्हटलं जात आहे. (Nashik Crime News)


हेसुद्धा वाचा : पुण्यात तरुणीचं मुंडकं कापलं; मृतदेहाचे तुकडे करुन धड नदीपात्रात फेकलं; एकच खळबळ


 


तपासातून प्राथमिक स्वरुपात समोर आलेल्या माहितीनुसार या दोन्ही मुली 25 ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. तेव्हापासूनच कुटुंबीयांनी या मुलींचा शोध सुरू केला होता. 26 ऑगस्ट रोजी लिंगामे गावातील एका गृहस्थांना या मुलींचे मृतदेह आढळल्याचं म्हटलं गेलं. सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आता ही आत्महत्या आहे की घातपात याविशयीचा शोध घेण्याची काम पोलीस यंत्रणेनं हाती घेतल्याचं सांगण्यात येत आहे.


पुण्यात तरुणीचा निर्घृण खून 


तिथं नाशिकची घटना धडकी भरवत असतानाच पुणे शहरातून खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार समोर आला आहे. इथं एका अनोळखी महिलेचा खून करून तिचा मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले आहेत. खराडी येथील नदीपात्राच्या तरुणीचे धड पोलिसांना आढळले असून, खून झालेल्या तरुणीचे वय अंदाजे 18 ते 30 इतके असल्याचे समजते. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजत आहे.