मुंबई : नाशिकच्या सटाणा तालुक्यातील तळवाडे भामरे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागला यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने परिसरात धुमाकुळ घालत एका मुलाला ठार केलं होते तर एका मुलीला जखमी केलं होते. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी या भागातील नागरिकांनी वनविभागकडे केली होती.अखेर या बिबट्याला पकडण्यात आल्याने या भागातील ग्रामस्थ बिबटयाच्या दहशतीतुन मुक्त झाले आहे.