पालघर : पालघरमध्ये नौदल कर्मचा-याची जिवंत जाळून हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी नेव्हीच्याच अन्य कर्मचा-यावर आरोप केला आहे. पैशांच्या व्यवहारातून हत्या केल्याचा वडिलांनी आरोप केला आहे. सूरजकुमारच्या वडिलांनी महेंद्र नावाच्या व्यक्तीवर हा आरोप केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेव्हीचा खलाशी सूरजकुमार मिथिलेश दुबे यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं. मूळचे रांचीच्या असलेल्या दुबे यांचं ३० जानेवारीला तिघांनी चेन्नई विमानतळावरून अपहरण केलं. रिव्हॉल्व्हर दाखवून त्यांच्याकडून मोबाईल लुटण्यात आला आणि १० लाखांची मागणी केली. चेन्नईमध्येच त्यांना तीन दिवस कोंडून ठेवण्यात आलं. तिथून पालघरमधल्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावात आणण्यात आलं.  इथल्या जंगलात नेऊन दुबे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं.


दुबे यांना होरपळलेल्या अवस्थेत मुंबईतल्या नेव्हीच्या अश्विनी हस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.