मुंबई : जय महाराष्ट्र म्हणून संजय राऊत राष्ट्रवादीला खुणावत असल्याचे राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. अजित दादा आणि संजय राऊत यांचा संपर्क असल्याचे सांगत राऊत अखेरचा जय महाराष्ट्र कोणाला करतात ते येत्या दिवसात कळेल असेही ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेना भाजपचे आता लिखित करारावर आलं आहे.भाजप सेनेचा करार फिस्कटला तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने पावले उचलावी लागतील असे तटकरे यांनी यावेळी म्हटले. भाजप सेना एकमेकांना खुणवत आहेत



सोनिया गांधी आणि पवार यांच्यात विरोधी पक्षनेत्या बद्दल चर्चा होईल. संजय राऊत आणि शरद पवार केवळ हवापाण्याबद्दल बोलले नाहीत. त्यांची राजकीय चर्चा झाली आहे. आघाडीचं भवितव्य पवार साहेबांवर अवलंबून असल्याचे तटकरे म्हणाले. 


'नमस्कार संजय राऊत जय महाराष्ट्र' असा मेसेज संजय राऊत यांनी अजित पवार यांना केला. त्यांना काय बोलायचे आहे माहित नाही, नंतर फोन करून विचारेल असं बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांना सांगीतले.


तर आता या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. तर महायुतीने लवकर सरकार स्थापन करावे. त्याचप्रमाणे पवार साहेब मुख्यमंत्री होणार याची सुतराम शक्यता नसल्याचे देखील ते या बैठकीत म्हणाले आहेत.


तर, नुकताचं झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आपल्याकडे १७५ आमदारांचे पाठबळ असल्याचे सांगीतले होते. त्यावर शिवसेनेकडे १७५ चा आला कुठून हे त्यांनाच माहित असे अजित पवार म्हणाले.