COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर : ४८ वर्षात काम झालं नाही ते ४८ महिन्यात झालं. बुलेट ट्रेनला मनसेपाठोपाठ शिवसेनेन विरोध केलाय. मात्र, या नव्या टेक्नॉलॉजीला विरोध करणं योग्य नाही, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलंय.


विरोध विचारांना केला पाहीजे, राजकारणात विचारशून्यता बाळगून आपण प्रत्येक गोष्टीला विरोध केला तर विकास कसा होईल असा प्रश्नही गडकरींनी उपस्थित केलाय.


राज ठाकरेंसोबत मी चर्चा करायला तयार आहे. मी सांगितलेली सर्व कामं केली आहेत, मी काम केलं नसल्याचं तुम्हाला दिसलं तर तुम्ही ब्रेकिंग न्यूज लावा. मी खोटं बोलणार नाही असंही नितीन गडकरी यांनी म्हटलंय.