पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्यामध्ये होते. त्यांनी आज येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की, 'कोणी माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही. हे सरकार स्थिर आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोपर्यंत 3 नेते एकत्र आहेत तोपर्यंत कोणीही हे सरकार पाडू शकणार नाही. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.


चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, 'लोकं रात्री झोपेत असताना कधीही हे सरकार पडू शकतं.'


मी वाटच बघतोय कधी सरकार कोसळतं. मी रोज रात्री उठून सगळे चॅनेल लावून बघतो सरकार पडलं की काय? अशी देखील विनोदी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.


चंद्रकांत पाटील हे मोठे व्यक्ती आहे. कशाला त्यांच्या नादी लागायचं. दुरुन डोंगर साजरे, असं देखील अजितदादांनी म्हटलं आहे.