जळगाव : जळगाव-धुळे मार्गावर आज पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विवाहसोहळा आटोपून कुटुंब परतीच्या वाटेवर असताना हा भीषण अपघात झाला. यात वाहन चालकाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळगाव-धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पारोळ तालुक्यातील दळवेल गावाजवळ ट्रक आणि कारची टक्कर झाली. टक्कर इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या बाजूचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचोरात राहणारे वाणी कुटुंब लग्नासाठी धुळयाला गेले होते. लग्नसोहळा आटोपून परतीच्या वाटेवर असताना दळवेल गावाजवळ हा अपघात झाला. शितल वाणी, रमेश वाणी, बंडू वाणी आणि दीपाली वाणी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मृतांची नावे : 


१) चेतन महाजन ( वाहनचालक )
२) बंडू वाणी त्यांची
३) पत्नी आणि 
४) आई 
५) रमेश वाणी तर


जखमींची नावे :


१) शितल वाणी, 
२) रमेश वाणी, 
३) बंडू वाणी आणि 
५) दीपाली वाणी जखमी