मुंबई : भाजपमध्ये ओबीसी नेते नाराज नाहीत. त्यामुळे कुणी तसं ओरडत असेल तर ते निरर्थक असल्याचं महादेव जानकर म्हणाले. पंकजा मुंडे नाराज नाही आणि त्या पक्षही सोडणार नाही असं जानकर म्हणाले. तर उद्धव ठाकरेंना विनंती करतो की, गेल्या सरकारने घेतलेले चांगले निर्णय त्यांनी रद्द करू नये, त्यांना चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा. मात्र आम्ही लवकर परत येऊ असेही जाणकर यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'भाजप' हटवल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहत आपल्या समर्थकांना भावनिक साथही घातली आहे. त्यामुळे परळीध्ये १२ डिसेंबरला राजकीय स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. या पराभवाला भाजपतील अंतर्गत कलह कारणीभूत असल्याचे म्हटले जाते आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत अनेक भाजप नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. पण आता भाजप नेत्यांकडून याबद्दल सारवासारव करण्यास सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे नाराज नसल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत आहे. 


पंकजा मुंडे नाराज नाहीत, त्या भाजपा सोडणार नाही असे भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले होते.


परळी मतदार संघातून पराजय झाल्यानंतर पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या प्रश्नांवर थोडा विचार करण्यासाठी स्वतःला वेळ हवा आहे. याकरता आपण आठ ते दहा दिवस कुणाशीही संपर्क साधणार नाही, असं पंकजा मुंडे त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाल्या.