पुणे : पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यात एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील आनंद नगरमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. संदीप डोंगरे, त्यांच्या पत्नी आणि त्यांची दोन मुलं गणेश विसर्जन मिरवणूक पाहायला गेले होते. रात्री घरी परतल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला.


मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यातील सार्थक या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर तिघांवर उपचार सुरु आहेत. हा विषबाधेचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र विषबाधा नेमकी कशातून झाली हे अद्याप समजू शकलं नाही. संदीप डोंगरे हे पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात.


पेस्ट कंट्रोलमुळे विषबाधा?


ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घरातून निघण्यापूर्वी त्यांनी स्वत:च्या घरात पेस्ट कंट्रोल केलं होतं. घरी परतल्यावर त्याचाच त्रास होऊन सगळ्यांना विषबाधा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.