भंडारा : शिवसेना सत्त्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा, मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान अशीच चर्चा होती. मात्र तसे झाले नाही त्यामुळे या दोन्ही पक्षाला योग्य वेळ आल्यावर जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलीय. 


तसेच सरकारचा सध्याचा कामकाजावर वेळोवेळी टीका टिप्पणी करणारे भाजपचे खासदार यांचावर देखील टोला मारीत त्यांनी नाना पटोले  यांनी  केवळ रडत बसू नये तर जनतेचे प्रश्न हे सभागृहात मांडावे ,अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी नाना पटोले यांच्यावर टोला मारीत दिली.