मुंबई : लोकप्रभात असताना बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचं सोडलं नव्हतं. आता माननीय बाळासाहेबांच्या आशिर्वादाने, उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने असं म्हणतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तू पत्रकार नाहीस आणि संपादकही नाहीस तुझी भाषा त्या पात्रतेची नाही. बेताल आरोप करतो. पण, काल अस्वस्थ का झाला. का बेजाबदार बोलत होता, घामाघूम झाला, थैयथैयाट होता, कशामुळे, प्रविण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर थैयथैयाट झाला.


काय असं आहे कि एवढा घाबरलास, का थैयथायट करतोयस. भाजपवर आरोप करतोय. या नेत्याचं असं आहे, त्या नेत्याचं असं आहे. पुरावे एक तरी दे पत्रकार आहेस ना.


आम्ही सांगतो, तुझी अलिबागची ५० एकर जमीन ५० लाखात घेतली. रस्ताही तुझ्या खात्यातील फंडातून केला, हे पैसे आणले कुठून, सुजीत पाटकर कोण, तुझा कोण लागतो, त्याच्या नावावर एवढे व्यवहार कसे काय करु शकतात, त्याच्या कंपनीत तुझ्या मुली कशा काय डायरेक्टर असू शकतात. दुसऱ्यांचं काढतो, पण आधी स्वतःवर जे आली त्याचं उत्तर दे. 


संजय राऊतचं लक्ष उद्धव ठाकरे जिथे बसले आहेत ना त्या खुर्चीवर आहे. हा शिवसेनेचा नाही, तर पूर्ण राष्ट्रवादीचा आहे. त्याला सुपारी मिळाली आहे, यांना हटव तुलाच करतो आम्ही.


कारण, उद्धव ठाकरे जेव्हा पवार साहेबांना भेटायला गेले पहिल्यांदा उद्या नाव जाहीर होणार होतं मुख्यमंत्र्यांचं, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आदित्य आणि संजय राऊत होते. ते नाही तर मी असं म्हणाले होते.