औरंगाबाद  : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपला पुन्हा एकदा 'एकला चालो रे'चा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना आणि भाजप यांच्या मैत्रीतील कटुता दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर सभेत भाजपचं नाव न घेता इशारा दिला आहे. 


शिवेसेनेचं एकला चालो रे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता बस झालं, एकटं लढणार आणि जिंकणार, असा विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या जिव्हारी लागणारे प्रश्न देखील यावेळी केले. यात उद्धव ठाकरे यांनी काही सवाल केले, यात ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला कधी भाव मिळणार? आणि सर्व शेतकरी कधी कर्जमुक्त होणार?.


राष्ट्रवादीचाही घेतला समाचार


एवढंच नाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादीचा देखील समाचार घेतला, राष्ट्रवादीवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, डल्ला मारून हल्लाबोल यात्रा काढतायत.


औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण इथल्या विहा मांडवा या गावी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.