ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेत बहुमतासाठी लागणारा २७ चा आकडा शिवसेना-राष्ट्रवादी युतीनं पार केलाय. २६ गटात शिवसेना, ९ गटात राष्ट्रवादी विजयी झालीय. भाजप १४, अपक्ष आणि काँग्रेसला एक-एक जागा मिळालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, ठाण्यात शिवेसनेचा गड आला पण सिंह गेलाय. ग्रामिण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांचा पराभव झालाय. चुरशीच्या लढतीमध्ये भाजपच्या शांताराम पाटील यांनी अवघ्या ३३ मतांनी त्यांचा पराभव केला. तर ठाण्यात शिवसेनेला मिळालेलं यश हे शिवसेनेचं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं असल्याची प्रतिक्रिया ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय.