नाशिक : सोनई हत्येप्रकरणी निकाल आता २० जानेवारीला लागणार आहे. आज दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद करण्यात आला. जानेवारी 2013 मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हे हत्याकांड घडलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या २० जानेवारीला या प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. अ‍ॅडव्होकेट उज्वल निकम यांनी दोषींना मृत्यूदंड देण्याची मागणी केली.


काय होतं प्रकरण?


सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी इथं जानेवारी 2013 मध्ये सचिन सोहनलाल ऊर्फ मोहनलाल ऊर्फ सोमलाल घारु, संदीप राजू थनवार आणि राहुल ऊर्फ तिलक राजू कंडारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 


असं घडलं होतं हत्याकांड?


नेवासे फाटा इथल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये हे तिघे कामाला होते. स्वच्छतागृहाची टाकी साफ करायचीय असं सांगून त्यांना विठ्ठलवाडीला बोलावण्यात आलं. धनवार आणि कंडारे यांचा खून करून मृतदेह कोरड्या विहिरीत पुरण्यात आले. तर घारु याचे मुंडकं आणि हातपाय अडकित्त्याने तोडण्यात आलं होतं. तोडलेले हातपाय एका कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, पोपट दरंदले, गणेश दरंदले, अशोक फलके, अशोक नवगिरे, संदीप कुर्‍हे यांना अटक करण्यात आली होती. यापैकी अशोक फलकेला निर्दोष ठरवण्यात आलंय.