जळगाव : डोकलामच्या मुद्द्यावरुन सध्या भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झालाय. याच दरम्यान, जळगावातील हजारो विद्यार्थ्यांनी आज चायना वस्तूंवर बहिष्कार घालण्याची सामूहिक शपथ घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेच्यावतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. 


जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून स्वतः विद्यार्थ्यांना शपथ दिली. चिनी माल विकत घेऊ नये असं आवाहन यावेळी करण्यात आले.