नाशिक : शेतकरी कर्जमाफीबाबत प्रमुख भूमिका निभावणा-या सुकाणू समितीच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरू करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्यापासून नाशिक येथे भव्य एल्गार सभा घेऊन या जनजागरण यात्रेची सुरूवात करण्यात येणार आहे. सुकाणू समिती संपूर्ण राज्याचा दौरा करणार असून प्रमुख 14 ठिकाणी भव्य जाहीर सभांना संबोधित करणार आहे. 


राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात केलेल्या फसवणुकी विरोधात यात्रेतून जनजागरण केले जाणार असून संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यासाठी लढ्यची दिशा ठरवली जाणार आहे. 


या जनजागरण यात्रेत शेतक-यांच्या मनातील या भावना समजून घेऊन लढ्याची पुढील रणनिती ठरवली जाणार आहे.