Shinde vs Thackeray: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर खरी शिवसेना (Shivsena) कोण यावरुन शिंदे (Shinde Faction) आणि ठाकरे गट (Thackeray Faction) आमने-सामने आहेत. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात असून अद्यापही निर्णय आलेला नाही. निवडणूक आयोगासमोरही धनुष्यबाण चिन्हावरुन दोन्ही गट आमने-सामने असून सुनावणी सुरु आहे. दुसरीकडे दोन्ही गट आपलं राजकीय बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून यानिमित्ताने पक्षप्रवेश सुरु आहेत. त्यातच आता शिंदे गटाने थेट आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात (Aditya Thackeray Worli Constituency) घुसखोरी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरळीमधील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील होते नगरसेवक होते. यानित्ताने आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील पहिला नगरसेवक शिंदेंच्या गटात सामील झाला आहे. समाधान सरवणकर, शीतल म्हात्रेंच्या पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातला माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने चर्चा रंगली आहे.


ठाण्यात शिंदे गट शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत


शिंदे गट आपलं राजकीय वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस निशाण्यावर आहे. शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची तयारी करत असल्याची माहिती आहे. यामध्ये काही मोठ्या नेत्यांचा समावेश असून एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होऊ शकतो. यानिमित्ताने शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांना राजकीय शह देण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे.  


राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न - आव्हाडांचा आरोप


"पैसेवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला 1 कोटी देतो, तुझ्या पत्नीला 1 कोटी देतो अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरु झाले आहे. तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला 10 कोटी रुपयांची कामे...ही आहे राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत," असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत केला आहे. 


"माझा बंधुतुल्य सहकारी जितू पाटील जो मागच्या निवडणूकीत निवडून आला होता, त्याला वेगवेगळी आमिष दाखवून पैसेवाल्यांच्या सेनेत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी बटलू गद्दार हा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आता मोरयासारखे जाऊन तिथे 4-4 तास त्याच्या घरी बसाल, तर तो काय घरातून हालकून देईल पण आपण किती वेळ कोणाच्या घरी बसावं ह्याची तर लाज बाळगा. लोचटासारखे किती वेळ बसाल," असा संतापही आव्हाडांनी व्यक्त केला.


"सगळेच धंदा करायला बसलेत आणि स्वतःचा विक्रीचा रेट लावतायेत असे समजू नका. काही स्वाभिमानी माणसं सुद्धा ह्या जगात जिवंत आहेत. पैशाने सगळ्यांनाच विकत घेता येतं हा डोक्यातला भ्रम काढून टाका," अशा शब्दांत आव्हाडांनी सुनावलं.