नवी मुंबई : एकाच वेळी तीन केमिकल कंपन्यांना भीषण आग लागली. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आलमा, वैष्णवी आणि नारलबस कंपन्यांना आग लागली आहे. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन कंपण्यांना लागलेली आग विझविण्यासाठी वाशी, ऐरोली, सीबीडीसह पनवेल अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. नवी मुंबईत एकाच वेळी तीन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडल्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.