अलिबाग : नागावच्या समुद्रात तीन जण बुडाल्याची घटना घडलीय. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात ही घटना घडलीय. नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथले पर्यटक नागाव इथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र, रात्रीपासून हे तिघेही बेपत्ता होते. या तिघांचा पोलीस आणि कोस्टगार्डच्या माध्यमातून तपास सुरु होता. सकाळच्या सुमारास या तिघांचे मृतदेह सापडलेत. 


चैतन्य किरण सुळे, आशीष रामनारायण मिश्रा आणि फहाद सिद्दीकी अशी या तिघांची नावे आहेत.